सोलापूर : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
पावणेचार वर्ष रखडलेल्या या निवडणुका अखेर लागल्याने कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवार 15 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 23 ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.31 डिसेंबर रोजी अर्ज छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन जानेवारी 2026 ही शेवटची तारीख आहे.त्यानंतर तेरा दिवस प्रचाराला देण्यात आले असून 15 जानेवारीला राज्यात महापालिकेसाठी मतदान होणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध