सोलापूर : मंगळवेढा पोलीस ठाणे अंतर्गत ऑपरेशन शोध मोहिम राबवून बेपत्ता झालेल्या ७३ महिला व ५० पुरुष असे एकूण १२३ बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांना यश आले आहे. या मोहिमेत सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा पोलीस ठाणे अव्वल ठरले आहे.
राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाकडून राज्यभर बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शोध मोहिम सर्वत्र राबविण्यात आली.
सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने मंगळवेढा विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे,पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांनी मंगळवेढ्यातून बेपत्ता झालेल्या ७३ महिला व ५० पुरुष असे एकूण १२३ व्यक्तींना शोधून काढले आहे. सर्व सन 2016 ते ३० मे २०२६ या कालावधीतील या बेपत्ता व्यक्ती आहेत.कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात,पुणे,मुंबई,लातूरयवतमाळ, परभणी आदी ठिकाणाहून लोकेशन व सी.डी.आर. या तांत्रिक माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात आला आहे.महिला पोलीस उपनिरीक्षक आरती कणिरे यांनी मंगळवेढ्याचा कार्यभार घेतल्यानंतर ३५ बेपत्ता असलेल्या मुलींनाही शोधण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या या तपास शोध कामात पोलीस हवालदार श्रीराम ताटे, पोलीस अंमलदार राहुल सोनकर यांनीही परिश्रम घेतले आहेत. हे ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल वरिष्ठांनी या टीमचे कौतुक केले आहे.

More Stories
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ राज्य अतिरिक्त सरचिटणीसपदी अरुण क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी गिरीश जाधव
गोष्ट जिल्हा परिषदेच्या शाळेतील 19 विद्यार्थ्यांच्या हृदयांची
होय, गायरानावर अडकली गरिबांची घरकुले!