पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग झाला सज्ज
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आषाढी यात्रेत होणार तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिर

सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर जिल्ह्यातील आषाढी वारी आरोग्य सेवेची तयारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी आरोग्यवस्थेच्या तयारीची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.
जिल्ह्यामधील आषाढी यात्रेनिमित्त पायी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्यदायी सुविधा देण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील पाच दिवस अगोदर सर्व पिण्याच्या पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करण्यात येत आहेत. या मार्गावर टँकर भरण्याच्या ठिकाणी *पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण* असे फलक लावण्यात आले आहेत .पालखी मार्गावर अगोदर दोन दिवस सबंधित ठिकाणी धूर फवारणी व एक महिना अगोदर कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. सर्व दिंडी प्रमुखांना एकूण 4500 औषध उपचार किटची व्यवस्था करण्यात आलेली आहे व वारकऱ्यांना किरकोळ औषध उपचारासाठी आवश्यक सूचना, अत्यावश्यक संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. पालखी मार्गावरील आरोग्य जनजागरणसाठी चित्ररथ तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये मधुमेह, उच्चदाब, साथरोग प्रतिबंध इत्यादी विषयक आरोग्य शिक्षणही देण्यात येणार आहे. पालखी मार्गावर सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य निश्चित करण्यात आलेले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्य अधीक्षक, आरोग्य कर्मचारी यांच्यावर संबंधित जबाबदारी देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त जिल्हास्तरीय अधिकारी व सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पालखी मार्गावर एकूण 143 आरोग्य सल्ला व उपचार केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. या मार्गावर जिल्हा रुग्णालय 1 असून उपजिल्हा रुग्णालय 3, ग्रामीण रुग्णालय 15, प्राथमिक आरोग्य केंद्र 42, आयुष आयुर्वेदिक उपचार केंद्र 5 असे कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त 102 रुग्णवाहिका 42, प्रत्येकी मुक्कामी 108 रुग्णवाहिका 16, फिरते वैकीय पथक 22, आरोग्य दूत 121, तसेच दहा दिंडी बरोबर एक आरोग्य दूत असेल.
अधिकारी संख्या 440, कर्मचारी संख्या 435 आशा कार्यकर्ती 2529 असा ताफा ठेवण्यात आलेला आहे
*प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी* प्रत्येक पाणी स्त्रोत्राचे संरक्षण व पाणी नमुने तपासणी 791 नमुने तपासणी एक महिना अगोदर करण्यात आलेली आहे. अशुद्ध पाणी नमुने फेर तपासणी सात दिवस अगोदर गरजेनुसार करण्यात आलेली आहेत. पाणी स्रोतचे टँकर भरणा ठिकाणचे शुद्धीकरण पाच दिवस अगोदर करण्यात आलेले आहे. टँकर तपासणी, ओटी टेस्ट, कंटेनर सर्वे, धूर फवारणी गाव व रोग विषयक विविध योजनेसंबंध बॅनर्स व पोस्टर लावण्यात आलेले आहेत. अबेटिंग व गटार आणि घाण पाण्यावर डस्टिंग करण्यात आलेले आहे. हॉटेल तपासणी व स्वच्छते विषयी पत्र देऊन हॉटेल कामगाराची वैयक्तिक तपासणी व हॉटेलमधील पाण्याची ओटी टेस्ट घेण्यात आलेली आहे.
*उपचारत्मक कार्यवाही*
प्रति पाच किलोमीटर अंतरावर आरोग्य सल्ला व उपचार केंद्राची स्थापना आणि आरोग्य संस्था व डॉक्टरांचे मोबाईल नंबर प्रदर्शन दोन दिवस अगोदर 143 ठिकाणी करण्यात आलेले आहे रुग्णवाहिका सुविधा 102( 42) आणि 108 (16) असून दोन दिवस अगोदर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. फिरते वैद्यकीय पथक मुक्कामाच्या दिवशी एक प्रत्येक दिंडीसोबत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. खाजगी रुग्णालयाच्या आपत्कालीन व्यवस्थेसाठी सात दिवस अगोदर 81 खाजगी रुग्णालयाच्या एकूण खाटांपैकी दहा टक्के खाटा वारकरी रुग्णासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेशित करण्यात आलेले आह. दिंडी प्रमुखांना औषध उपचार किटचे वाटप करण्यात येणार आहे. आरोग्यदूत बाईक ऍम्ब्युलन्स दिंडी सोबत 121 राहणार आहेत. तंबू Tent उपचार केंद्र माळशिरस 5 व पंढरपूरला 4 एकूण 9 उपचार केंद्र आहेत.
याव्यतिरिक्त शासकीय हॉस्पिटल 1169 बेड, खाजगी हॉस्पिटलच्या 1299 बेडची संख्या उपलब्ध करण्यात आलेली आहे.
108 कॉलच्या ई एम एस सेवा रुग्णवाहिका सेवा पालखी मार्गावर वारकऱ्यांना योग्य त्या व वेळेवर औषध उपचार आवश्यक सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना संदर्भित करण्यासाठी 108 योजनेच्या नियोजनबद्ध उपयोग करण्यात येणार आहे. तसेच पालखी मार्गावरील 42 प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये रुग्णवाहिका औषध उपचारासह व तज्ञ डॉक्टरासह सज्ज ठेवण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी धर्मपुरी पालखी तळावर आरोग्याच्या सुविधाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली. आषाढी यात्रा काळात प्रतिवर्षाप्रमाणे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिरही होणार आहे.