सोलापूरराजकीय

सोलापूरच्या “या’ आमदाराला मिळणार मंत्रीपदाची संधी

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान आणि सलग पाचव्यांदा आमदार होऊन प्रदेश भाजपमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विजयकुमार देशमुख यांना महाराष्ट्राच्या नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळात कॅबिनेट  मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याचे भाजपमधील सूत्राने सांगितले.

आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाचव्यांदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. सोलापुरात भाजप वाढीसाठी त्यांनी मोठे काम केले आहे. आत्तापर्यंतची त्यांची वाटचाल पाहिल्यास सन २०१४ साली सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी असताना महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपची एक हाती सत्ता आणण्याची त्यांनी किमया साधली होती. आत्तापर्यंतच्या राजकीय वाटचालीत अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना जवळ करीत विधायक पदांवर बसून शहर उत्तर आणि शहराचा विकास साधण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य संजयमामा शिंदे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडण्यासाठी  सर्व विरोधी पक्षांना एकत्र करीत झेडपीवर पहिल्यांदा  भाजपचा झेंडा फडकवला.सोलापूर शहर जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेली बाजार समितीची निवडणूक विरोधी गटात जाऊन बाजार समितीचे सभापती पद मिळवले. या पदावर असताना शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेण्यात यश आले. बाजार समितीचा विस्तारही केला. सोलापूर बाजार समितीचे डिपॉझिट ६६ कोटी होते. विजयकुमार देशमुख सभापती झाल्यावर त्यांनी डिपॉझिटमध्ये शंभर कोटीची वाढ करीत बाजार समिती मधील अंतर्गत रस्ते केले. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीवेळी जवळचे मित्र असलेले प्रशांत परिचारक यांना विधानपरिषदेवर निवडून आणण्याची खेळी यशस्वी केली.कोणताही राजकीय अनुभव नसताना गुरुस्थानी असलेले डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना महिन्याभरात भाजपची उमेदवारी मिळवून देऊन त्यांना खासदार म्हणून निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द खरा करून दाखविला.

शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांच्या शहर जिल्ह्यातील नेत्यांचा विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. या तिन्ही पक्षात समन्वय साधण्याचं कसब देशमुख यांच्याकडे असल्यामुळे भाजपला कायम उपयोगी येणारे अशी त्यांचे प्रदेश भाजपमध्ये ओळख आहे. प्रदेश भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी आजपर्यंत यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मतदारसंघ आणि शहरात सतत लोकांच्या कामासाठी वेळ देवून र भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभेचे निवडणूक झाली आता लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेची निवडणूक लागणार आहे. पुन्हा एकदा महानगरपालिकेवर सत्ता आणायची असल्यास विजयकुमार देशमुख यांच्यावरच भाजपकडून जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या भाजपकडे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा वाढता ओघ लक्षात घेता नियोजन करण्यासाठी विजयकुमार देशमुख यांच्या व्यतिरिक्त योग्य सक्षम नेतृत्व भाजपकडे नसल्याने सोलापूरचे पालकमंत्री पदाबरोबरच कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले. या विधानसभा  झाले. आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा दुसऱ्यांदा आमदार झालेले सचिन कल्याणशेट्टी व समाधान आवताडे यांनाही संधी मिळणार का? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button